Monday, January 9, 2012

कालयं तस्मे नमः


                बरेच दिवस स्वतःशी व्यक्त व्हायला संधीच मिळाली नाही..आज वेळ काढुन बसलो....ह्या दरम्यानच्या काळात बरेच काही घडुन गेलं...बरेच काही...अनेक नविन मित्र मैत्रीणींशी ओळख झाली...जुन्या मित्रांसोबत गोव्याची सफर...आहाहा...अगदी अफलातुन अनुभव..बस..मी आणी माझी तनहाई वाला फिल देणारा तो तारकर्लीच्या डॉल्फीनसफारीचा अनुभव...अफलातुन...आजुबाजुला नजरेच्या टप्यातही न मावणारा तो निळा समुद्र अन मी....बस...अजुन कश्याचीही अपेक्षा नव्हती....अगदी सुरेख...बाप्पाच्या आशिर्वादाने अनेक प्रश्नांची उकल झाली..असे प्रश्न जे 2010 साली माझ्या डोक्यांत वादळासारखे घोंघावत होते..त्यातले अनेक प्रश्न उलगडले....

               मुख्यत्वे अश्या काही व्यक्ती जवळ आल्या ज्या आयुष्याला वेगळाच अर्थ देऊन गेला..अनेक मोठ्या मोठ्या  व्यक्तींशी ओळख झाली..अन त्यांच्याकडुन कवितांवरही दाद मिळाली...उदाहरणास्तव सांगायचे तर चंद्रशेखर गोखले...ह्यांची माझ्या एका चारोळीला आलेली दाद हा तर अविस्मरणीय प्रसंग..एखाद्या गल्ली क्रिकेट खेळणा-या पोराला सचिन तेंडुलकरने पाठीवर थाप मारुन मस्त शॉट बोलावे असा तो फिल...अगदी साबीर काका..म्हणजे उर्दु गझलेचे बेताज सम्राट...त्यांच्याशी परिचय झाला..त्यांच्याकडुनही मार्गदर्शन मिळाले....निशब्द देव ने गझल नावाची नशा डोक्यात भिनवली...एकुण काय तर गेले वर्ष अगदी अप्रतिम..
              त्याचसोबत काही व्यक्तींचे खरं रुप देखील अगदी जवळुन पाहायला मिळाले की काही व्यक्ती कश्या स्वतःचा विचार करतात फक्त...समोरचा व्यक्ती..आपल्याविषयी काय विचार करेल ह्याची किंचितही चिंता त्यांना नसते...तिच ती अन तोच मी...अन सरलेला फक्त दोन वर्षांचा काळ....अन त्या दोन वर्षांनतरही त्या व्यक्तीत न घडलेला फरक...इतके सारं घडुन गेलं...तरीही पुन्हा तेच पालुपद आता खरचं सांगावं तर किव यायला लागलीय...असोत व्यक्ती तेवढ्या प्रव्रुत्ती...काय बोलावं....
              आता कोणीतरी विचारलं की नविन वर्षात आता काय करणार...माझे उत्तर एकचं..की मस्त जगुन घ्यायचयं.... आता स्वतःसाठी...अन तिच्यासाठी....बाकी काही नको....

असेच पाठीशी राहा मित्रांनो..तुमच्या प्रार्थनांची अन आशिर्वादांची खुप गरज आहे....

ओंकार तोरसकर