Wednesday, July 28, 2010

“वेदा”

"मंद वाहणारा वारा अजुनही तुझ्या केसात गुंतुन अडखळत होता, का जाणे माझेही मन गुंतलेय अजुन तुझ्या वेड्या आठवणींमद्ये"
अथर्वच्या डायरीवर लिहीलेल्या ह्या ओळींचा खरा अर्थ आज मला उमगत होता.तो बराच वेळ स्वतःला समजवत होता. पण आज त्याचे मन् कशातही लागत नव्हते… कशातही. तो काही केल्या “वेदा”ला विसरु शकत नव्हता. तशी ती होती ही कधीही न विसरता येईल अशीच, “वेदा” खरोखर ही इतकी गोड होती निरागस होती. कधी कधी वाटायचे की देवाने हीला बनवताना निरागसता थोड्या ढिल्या हाताने हिच्यात टाकली, इतकी गोड की साखरेलाही हेवा वाटावा. ओठांनी कधीच काही न बोलता डोळ्यांनी बरेच काही बोलणारी…. हस-या चेह-याची…

जगासाठी हे दोघे एक “बेस्टेस्ट फ़्रेंड्स” होते अन ते कायम तसेच राहीले पण त्यांच्या मनातल्या एकमेकांच्या बद्दलच्या भावना त्यांचे खरे नातं हे फक्त त्यांनाच ठाउक होत त्याची जगाला कधीच पुसटशी कल्पनाही आली नाही किंबहुना त्यांनी जाणवुच नाही दिले तिचं आणी अथर्वचे वागणे हे कायम "बेस्ट फ़्रेंड्स'' ह्या संकल्पनेला धरुनच होते. खरे म्हणजे ते दोघे आमच्या ग्रुपची जान होते....
माझं नाव "श्रेयश" पण माझे सगळे फ्रेंड्स मला "श्री" बोलतात. मी, “रिग्वेदा”,”अथर्व” आणी आमच्या सर्वांचीच लाडकी "प्रिया"(तिचे खरे नाव "सुप्रिया") पण तिच्या ख-या नावाने आम्ही कधी हाक मारली असे मला आठवत नाही. आम्ही चौघे चौकोनाचे चार कोन होतो तरीही आमच्या मधली मैत्री अन आमच्या मधले बॉंडींग इतकं पक्क होते की जगातली कुठलीही शक्ती आम्हाला वेगळे करु शकणार नव्हती.तसे मी आणी "वेदा" एकदम चाईल्डहुड फ्रेंड्स.. एकत्र खेळतच मोठे झालो एकाच शाळेत शिकलो अ टिपिकल “चाईल्डहुड फ्रेंड्स”. “वेदा” दिसायला अगदी चार-चौघात छान उठुन दिसणारी काळेभोर डोळे, गालावर सतत येणारी एक छोटीशी बट, चेह-यावर नेहमीच असणारे एक मंद स्मित, कधी कोणाला उलट उत्तर नाही कधीच कोणाशी भांडण नाही. आई वडीलांवर जिवापाड प्रेम करणारी “देवभोळी” मुलगी अगदी एखादी गोंडस बाहुली शोभावी अशीच होती आमची "वेदा" सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी.

खरे म्हणजे मला पण ती आवडायची तिही अगदी शाळेत असल्यापासुन, माझ्या जीवनसाथीत मला जे काही गुण हवे होते ते सगळे गुण “वेदा”त होते आणी तिचे माझ्या बरोबर बोलणे, वागणे हे सगळे छान होते तिने माझ्या कवीतांची वही अगदी माझ्या नकळत माझ्या बँग मधुन बाहेर काढावी त्यावर मनापासुन दाद द्यावी एखादी कवीता वाचुन मनसोक्त हसावे कधी नकळत दोन टिपे गाळावीत अगदी खर सांगतो त्यातल्या अर्ध्याहुन अधीक कवीता तर मी तिच्या वरच लिहीलेल्या होत्या ते अजुनही तीला माहीत नाहीय तिला समजेल तरी कसे मी तीला कधी काही बोललोच नव्हतो माझ्या मनातल्या तीच्याबद्दलच्या भावना मी ओठांच्याआडच ठेवल्या होत्या.कारण तीची नी माझी असलेली मैत्री ह्या मैत्री खातर मी कधी माझ्या फिलिंग्स बोलुन दाखवल्याच नाहीत. कारण मला तीला गमवायचे नव्हते. एक मैत्रीण म्हणुन मला तीला त्रास झालेला अजीबात चालायचा नाही अशी होती आमची "वेदा".
अन प्रिया म्हणजे एक जिवंत ज्वालामुखी होती आमच्यात सगळ्यात लहान असल्याने खुप लाडकी सगळ्यांची. खुप बडबडी जरा जास्तच जगातल्या कुठल्याही गोष्ठीवर हिची वाद घालायची टयारी नॉर्मली खुप शांत वाटायची पण एकदा डोक हललं की काही खर नाही अगदी मारकुट्या बैलासारखी शिंग तासुन तयार अंगावर आलेल्याला शिंगावर घेऊन नाचायला.

आता अथर्व म्हणजे आमच जिनेयस होता शाळेपासुनच स्कॉलर दिसायला अगदी राजकुमार नसला तरी बाकी पेर्सेनलिटी एकदम झक्कास.आणी मी म्हणजे अगदी कुठल्याही गर्दीत सहज हरवलेला इतका कॉमन बस एकच गोष्ठ होती जी मला सगळ्यंपेक्षा थोड वेगळ करायची ती म्हणजे माझ्या कवीता बस इतर काही नाही अभ्यासात अगदी स्कॉलर नसलो तरी अगदी नापास होण्याची वेळ मात्र आली नव्हती.
आमचे चौघांचे एक वेगळे विश्व होते आमची मैत्री म्हणजे वेदाने आणलेला एक टिफीन 4 जणांत वाटुन खाणे, एक कॉफी 4 जणांत शेयर……. बस अशीच होती आमची लाईफ. आता कॉलेज संपुन प्रत्येक जण जॉबला लागला होता आणी कोइंसीडेंडटली आम्हाला जँबही एकाच एरीया मद्ये होती त्यामुळे रोज् सकाळी एकत्र जाणे व घरी येताना एकत्रच येणे आणी रवीवार म्हणजे फ़ुल्ली धमाल वन डे पिकनीक आणी बरेच काही
मी शेवटी ठरवले की वेदाला घरातुन मागणी घालायची लग्नासाठी, इतका विश्वास होता की ती नाही बोलणार नाही तसे नाही बोलण्यासारखे माझ्यात होते तरी काय? शेवटी एक दिवस मी धीर करुन माझ्या आईला हे सगळे सांगीतले. तशी ती माझी खुप जुनी फ्रेंड असल्यामुळे तिचे आमच्या घरी कायम येणे जाणे तर असायचेच. आईला पण तशी ती आवडायचीच त्यामुळे तिने लगेच होकार दिला. आई म्हणाली की तु इतक्यात तिला काहीही बोलु नकोस ह्याच रवीवारी आपण तिच्या घरी जाऊन बोलणी करु आणी तिलाही सरप्राईज देऊया. ठरवल्याप्रमाणे आम्ही सगळे रवीवारी तिच्या घरी गेलो.सगळी बोलणी झाली तिचे आईवडीलही मला ओळखतच होते त्यांनी त्यांच्या बाजुने होकार दिला बस एकदा वेदाच्या कानावर घालुन तिचा निर्णय विचारुन घेऊयात असे ठरले. मला काहीच प्रॉब्लेम नव्हता.. तितक्यात घरी वेदा आली आम्ही सगळे तिला न सांगता तिच्या घरी का आलोय हे मात्र तिला कळत नव्हते.तितक्यात तिची आईच बोलली की श्री ने तुला लग्नासाठी मागणी घातलीय आमच्या बाजुने तर काही प्रॉब्लेम नाहीय बस तु तुझा निर्णय सांग म्हणजे बाकीच्या गोष्ठी सुरु करता येतील. तेवढ्यात मीच तिला बोललो की वेदा आजचा दिवस निट विचार करुन घे मी तुला उद्या कॉल करेन .... असे बोलुन आम्ही तिथुन निघालो.
दुस-या दिवशी वेदाने समोरुन मला कॉल केला आणी बोलली की आजवर माझ्या आईवडीलांच्या शब्दाबाहेर मी कधीच गेली नाही आणी आताही जाणार नाही त्यांनी जो काही निर्णय घेतलाय तो मला मान्य आहे. आता आमच्या लग्नाची बाकीची बोलणी झाली .तारीखही फिक्स झाली बाकी मी आता खुप खुश होतो बस... एकच गोष्ठ मनाला टोचत होती... की हे सगळे झाल्यापासुन का माहीत नाही अथर्व मात्र खुप बदलल्यासारखा वाटत होता.. त्याला फोन करावा तर एक दोन मिनीट बोलुन तो फोन ठेवायची खुप वेगळा वागत होता... त्याने अचानक जॉबही चेंज केला . इतक्यात तो आम्हाला भेटलाही नव्हता आणी कारण विचारावे तर नवा जॉब असल्याने कामाचा लोड जास्त असल्याचे त्याने सांगीतले मी त्यावर काहीच बोलु शकलो नाही. वेदा मात्र आताही नेहमीसारखीच शांत होती. तिच्या मनाचा मागमुसही ती कधीच कोणालाही लागु द्यायची नाही.तिच्या मनात विचारांचे वादळ उठले होते तरीही ती वरुन शांतच वाटत होती..काही दिवस असेच गेले..
मी आता अथर्वच्या घरी जाऊन त्याला भेटुया असे ठरवले प्रिया लगेच तयार झाली वेदा मात्र माझी तब्येत ठिक नाही तुम्ही जाऊन या मी नंतर भेटेन असे वारंवार सांगत होती. शेवटी माझ्या आणी प्रियाच्या हट्टापुढे तिला नमते घ्यावे लागले ति तयार झाली . आम्ही त्याच्या घरी गेलो आम्हांला तिथे बघुन तो चमकलाच... तो खुप डिस्ट्रब वाटत होता काहीतरी गोष्ठ अशी होती ज्यामुळे तो हरला होता.वेदा मात्र मला काही ठिक वाटत नव्हती तिची ती अवस्था पाहुन मी तिला घेउन तिथुन निघालो प्रिया मात्र तिथेच थांबली. दुस-या दिवशी मी जेंव्हा प्रियाला कॉल केला तेंव्हा ती जे काही मला बोलली ते ऐकुन मी खुप खुश झालो काल प्रियाने त्याला प्रपोज केलं आणी त्यानेही तिला होकार दिलाय...
मी हे जेंव्हा वेदाच्या घरी तिच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी गेलो आणी जेंव्हा तीला ही गोष्ठ सांगीतली तेंव्हा त्यावर ती काहीच बोलली नाही. आमचे लग्न झाले आमचे अख्खे कॉलेज आले होते बस एक व्यक्ती नव्हता अथर्व. मला त्याचा खुप राग आला होता त्या रागाच्या भरात मी त्याला फोन करुन वाटेल ते आणी वाटेल तसे बडबडलो.. पण तो काहीच बोलला नाही. नुसता ऐकत होता..थोड्या वेळाने वेदा तिथे आली आणी मला म्हणाली की बरेच दिवस तुला एक गोष्ठ सांगायची होती पण काही केल्या हिम्मत येत नव्हती. तु मला लग्नाची मागणी घातलीस पण आपण कॉलेजमध्ये असतानाच मी आणी अथर्वने एकमेकांना त्यांच्या ख-या फिलींग्स सांगीतल्या होत्या..वि आर कमीटेड फ्रॉम दँट टाईम.. तेंव्हा एकमेकांच्या प्रेमात आम्ही कधी पडलो ते आम्हालाच कळले नाही आणी ज्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आलात त्याच दिवशी मी माझ्या घरी सांगणार होते..पण कदाचीत खुप उशीर झाला.माझ्या आईवडीलांच्या शब्दाबाहेर मी कधीच गेली नव्हती आणी त्यादिवशीही केवळ त्यांनी तुम्हाला दिलेल्या शब्दाचा मान राखत मी तुला होकार दिला....
तुला आठवतेय का त्यादिवशी आपण दोघे निघालो तरी प्रिया तिथे बसुन होती त्या रात्री प्रियाने मला कॉल केला आणी मला ती बोलली की तिला अथर्व कॉलेज मध्ये असल्या पासुन आवडत होता..आणी आज त्याची ति अवस्था बघुन आज तिला त्रास होत आहे. तेंव्हा तिला मी म्हणाले की त्याच्या ह्या अवस्थेला केवळ एकच व्यक्ती जबाबदार आहे आणी ती म्हणजे मी स्वतःहा आणी मग तिला मी सगळे काही सांगीतले.बस तिला इतकेच बोलले की अथर्वची काळजी घे तो खुप एकटा पडला आहे आता त्याची काळजी नाही घेऊ शकणार मी पण प्लिज तु त्याला जप....ह्या जगात माझ्याशिवाय अथर्वला कोणी समजुन घेऊ शकणार असेल तर ती तुच आहेस प्रिया... माझ्या बोलण्यानुसार तीने त्याला प्रपोज केले आणी लवलरचे तेही लग्न करतील. हे सगळे ऐकुन माझ्या लक्षात आले की म्हणुनच त्यादिवशी मी जेंव्हा वेदाला ही गोष्ठ सांगायला आलो तेंव्हा तीने काहीच प्रतिक्रिया का दिली नाही.
हे सगळे ऐकुन मला मात्र खुप वाईट वाटले कारण अजाणतेपणी का होईना ह्या दोन प्रेम करणा-या जिवांच्या मध्ये येऊन त्यांचे स्वप्न मात्र मी कायमचे उध्वस्थ केले होते...

Saturday, July 3, 2010

पुन्हा एकदाच सांगायचेय तुला

तिला वाटले की तिच्याशिवाय तो जगुच शकत नाही.... नाही यार ते साफ चुकीचे होते....त्या तिच्या आठवणींच्या ओझ्याखाली त्याचे जगणे तसेच अवघडच होते पण असोत..... ति....तिच्या आठवणी ह्या मनातुन साफ पुसुन टाकणे त्याच्यासाठीतरी अशक्य होते.पण तरीही तो आज लढत होता.. त्याच्या विरुध्द स्वतःच्या मनाविरुध्द सुरवातीचे काही दिवस त्याचे मन गुदमरुन गेले होतं... जगण्याची जिद्दच तो हरवुन बसला होता.... आता जगायचे तरी कोणासाठी आणी का? एकटा असताना तो नेहमीच विचार करायचा की असेच एखाद्या अंधा-या रात्री माझ्या आयुष्याच्या दिव्याची फरफरती वात कोणीतरी चिमटीत पकडुन विझवुन टाकावी.... व ह्या जगाचा असाच गुपचुप निरोप घ्यावा....
कारण.... फक्त एकच "ती" हो तीच.... तो तीला श्रावणी बोलायचा "श्रावणी" हे नाव देण्यामागचे कारण म्हणजे तिचे मनमुराद हास्य अगदी श्रावणसरीसारखेच.... अगदी निरागस अगदी गोंडस...पण नंतर समोर यायला लागला तिचा बुरख्याआडचा चेहरा जो त्या श्रावणी संकल्पनेच्या पार विरुध्दच होता.. तितकाच भेसुर.. आक्राळविक्राळ....इतके दिवस तिने मुद्दाम तो चेहरा आपल्या निरागस चेह-याच्या आड दडवला होता....तो चेहरा ति तशीच सर्वांपासुन लपवत होती पण त्याला मात्र दिसत होती... त्याची सदा हस-या चेह-याची श्रावणी... तिच्या त्या हसण्यामागचे कारस्थान मात्र तो दिसत असुनही न पाहील्यासारखेच करत होता... कारण त्याने तिच्यावर मनापासुन केलेले प्रेम...शरीरावर नाही तर आत्म्यावर... मनावर...तिच्यातल्या त्या गोंडसपरी वर केलेले प्रेम...
त्याला अनेकांनी रोखण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला पण सगळेच व्यर्थ…कदाचीत हे नातंच देवाला मान्य नव्हते असेल तरी कसे? त्याचा पायाच खोट्याच्या आधाराने बांधला गेला होता आणी त्या आधारावर ते नातं कधीच उभे राहू शकले नसते....आणी जरी राहीलेच असते तरी ते तात्कालीक आयुष्यभर साथ मिळेल ह्याचा भरोसा कोणीही देऊ शकले नसते..... कालच कुठेतरी वाचनात आले की जेंव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलासाठी रडते, तेंव्हा त्याचा अर्थ होतो की ती त्या मुलावर खुप प्रेम करते पण जेंव्हा एखादा मुलगा त्या मुलीसाठी रडतो तेंव्हा त्याचा अर्थ होतो की त्या मुलीवर त्या मुलापेक्षा जास्त प्रेम कोणीही करु शकत नाही.... तो तिच्यासाठी वारंवार रडत होता तीला समजावत होता,,, पण....
त्याचा काहीच उपयोग होत नव्हता ... किंबहुना त्याच्या डोळ्यातल्या अश्रुंची आज तीला किंमतच उरली नव्हती. त्याच्या ध्यानीमनी नसताना ती त्याला म्हणाली की माझ्या आईवडीलांनी माझे लग्न ठरवले आहे ....त्याच्यावर तर आभाळच कोसळले होते.... काहीच कळत नव्हते...काय करावे कसे रोखावे तिला....काहीच नाही पण आज ती काहीही ऐकण्याच्या मनस्थीतीतच नव्हती,,,, खरेच झोपलेल्या व्यक्तीला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेणा-या व्यक्तीचा झोपमोड होणे अशक्य... तीचेही अगदी तसेच होते...तीला आज समजुन घ्यायचे नव्हते.... नंतर ती जे काही वागली त्याचा कोणालाच अंदाज बांधता आला नाही.... म्हणतात न की एक खोटे लपवण्यासाठी... अनेक खोटी बोलावी लागतात..... तो तीला म्हणालाही होता.. की चल आपण पळुन जाऊ...तेंव्हा ती म्हणाली होती..की मला पळुन जाऊन लग्न नाही करायचे...
त्याने तीचा नादही सोडला व त्याने आता त्याचे ध्येय ठरवले की इतके मोठे व्हायचे की जगातली कुठलीही मुलगी त्याला नकार देऊच शकणार नाही. तो पुन्हा रमु लागला तीच्या आठवणी मनात दाबुन टाकल्या त्याने ... पण ती.... तीने सुरु केले नवीनच नाटक रोज नवे आरोप रोज नवे आरोप...ठाऊक होते.. तीला की त्याला वाद नाही आवडत...पण तीचे नेहमीच हे सुरुच होते...त्याने त्याच्यावर लक्ष नाही दयायचे असे ठरवुन तो... धावत होता..आपल्या ध्येयाकडे.....
तीचे तिथे चाललेल्या प्रत्येक गोष्ठी त्याला समजतच होत्या.... ती जे काही वागत होती... त्याचा परीणाम ह्या त्याचावर होत होता..पण तरीही तो टाळत होता... तीला. तीच्या त्या वागण्याला .... तीच्या ह्या वागण्याला कंटाळुन तीच्या आजुबाजुच्या सगळ्या व्यक्ती तीला सोडुन निघुन गेल्या होत्या.. त्या सगळ्यांनी तीची चुक दाखवुन देण्याचा अनेकदा प्रयत्न करुन पाहीला पण सारे व्यर्थ होते... ती कोणाचेच ऐकत नव्हती... आणी ऐकायचेही नव्ह्ते तिला दिसत होते. ते बस. ती आणी तो.... ज्याच्या साठी ती त्या वेड्या मुलाला पण सोडुन आली होती....काय कारण होते त्यामागचे पैसा.... जात.... की अजुन काही..... देवच जाणे..... त्या वेड्या मुलाला सोडायला काहीच कारण नव्हते...
तीला त्रास होईल असे काहीच वागत नव्हता तो...मग तरीही तीने त्याला का सोडले? ती आणी तो... दोघेही वेगळ्याच वाटेने आणी... ती दिंडोरा पिटत फिरत होती. की माझ्या आई वडीलांनी आमचे लग्न ठरवले आहे आणी काही दिवसांनी जी गोष्ठ कानावर पडली ती ऐकुन त्या मुलाचा स्वतःच्या कानावरच विश्वास नाही बसला..... " की तीने पळुन जाऊन लग्न केलं".....
त्याच्या सहज मनात आले की पळुन जाऊनच लग्न करायचे होते...मग..इतके खोटे बोलायची काय गरज होती... का दाखवलीस माझ्या वेड्या मनाला सप्तरंगी स्वप्ने... का घेतल्यास खोट्या शपथा.... का? देशील उत्तर? देऊच शकत नाहीस...कारण तु मला फसवलेयस..... आणी खरे सांगु का..... आता इथे भेटलीयस... पुन्हा आयुष्यात भेटु नकोस.....पुन्हा एकदाच सांगायचेय तुला की माझ्यासारखे पुन्हा कोणालाच फसवु नकोस....

बस.... अजुन तो मुलगा मला काही सांगुच शकला नाही.... डोळ्यातले अश्रु गोठवुन तो आताही माझ्यासमोर उभा आहे. अगदी शांत काहीही न बोलता... पण तरीही बरेच काही बोलणारा.......

ओंकार